gudhi-padwa

घर खरेदीची आता आलीय सुवर्णसंधी...!

कोरोना महामारीचा परिणाम सामान्य जनजीवनावर झाला आहे. आर्थिक क्षेत्र थोडेसे मंदावले आहे. लॉकडाऊनमुळे अनेकांचा रोजगार हिरावला असला तरी, कोरोनाने व्यवसायाच्या नवीन संधीही उपलब्ध करून दिल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून परिस्थिती पूर्वपदावर येत असल्याने सर्वसामान्य लोकांच्या जीवनात आशेचा एक नवा किरण आला आहे.

कुठलीही परिस्थिती नेहमीसाठी जशीच्या तशी राहत नसते. त्यात बदल होतो. शेवटी परिवर्तन हा निसर्गाचाच नियम आहे. त्यामुळे येत्या काळात आपलेही स्वप्न साकार होईल, अशी आशा सर्वसामान्य कुटुंबांच्या मनात निर्माण झाली आहे. स्वतःच्या मालकीचे घर असावे, हे प्रत्येकाचे स्वप्न असते. ते साकार होण्यासाठी थोडीशी प्रतीक्षा करावी लागते हे मान्य, पण मनःपूर्वक प्रयत्न केले तर ते साकार होतेच...!

सध्या घरांच्या किमती स्थिर आहेत. एकंदरीत प्रॉपर्टी मार्केटचा आढावा घेतला तर घराची खरेदी करण्यासाठी ग्राहकांकडे हीच चांगली संधी चालून आली आहे. सध्याची परिस्थिती ज्यांना खरेच घर घ्यायचे आहे, त्यांच्यासाठी खूप चांगली आहे, असे तज्ज्ञांचेदेखील मत आहे. औरंगाबाद शहरात घर किंवा प्रॉपर्टीच्या किमती वाढलेल्या असल्या तरी विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या घरांची संख्या खूप मोठी आहे. सध्याचे घरांचे दर आणखी कमी होण्याची वाट न पाहता, ग्राहकांनी आलेल्या सुवर्णसंधीचा फायदा घ्यावा, असेही काही वास्तूशिल्पकार सांगतात. सद्यस्थिती पाहता, पुढच्या दोन वर्षात घरांच्या किमती आणखी वाढतील, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.

घराच्या खरेदी-विक्री व्यवहारांमध्ये ग्राहकाची पसंती महत्त्वाची असते. अशा वेळी सूट आणि सवलती मिळतात म्हणून ग्राहकांनी केलेली घराची खरेदी भविष्यात धोक्याची ठरू शकते. कमीत कमी दरात घर मिळावे, अशी ग्राहकाला अपेक्षा असते. पण अशा प्रसंगी घराचे लोकेशन, बांधकाम, मूलभूत सोयी-सुविधा, व्यवहारातील विश्वासार्हता आणि इतर अशा सर्वच गोष्टींचा विचार करून सर्वच अंगांनी ते घर किती चांगले आहे, हे ग्राहकांनी आधी जाणून घ्यायला हवे.

औरंगाबाद शहर आता खूप विस्तारले आहे. शहरात उंच इमारती, माणसांची गजबज, उद्योगधंद्यांमुळे औरंगाबादचा चांगलाच विकास झाला आहे. औरंगाबादेत जो कोणी येईल, तो कधीही उपाशी राहणार नाही, एवढे उद्योगधंदे येथे आहेत. रोजगाराचे प्रमुख केंद्र म्हणून आज औरंगाबादकडे पाहिले जाते. गावात शिक्षण घेतलेल्या प्रत्येक तरुणाची उच्च शिक्षणाकरिता शहरात येण्यासाठी धडपड सुरू असते. शिक्षण, नोकरी, कला, व्यवसाय, उद्योजकता या सर्वच क्षेत्रात औरंगाबाद सरस आहे. त्यामुळे या शहरात आपलेही स्वतःचे घर असावे, असे स्वप्न पाहणाऱ्या कुटुंबांनी त्वरित पाऊले टाकायला हवीत. भाडय़ाने घर घेऊन राहण्याऐवजी मालकीच्या घरासाठी प्रयत्न करायला हवेत.

आर्च ग्रुपचे अनेक सर्वांगसुंदर गृहप्रकल्प आहेत. शहराच्या मध्यवस्तीत, तसेच निसर्गाच्या सान्निध्यात अनेक गृहप्रकल्पांचे बांधकाम सुरू आहे. औरंगाबाद शहर आणि आसपासच्या भागात निसर्गरम्य परिसरातील प्रशस्त फ्लॅट्स, रो-हाउसेस नागरिकांच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहेत. भविष्यकाळात मोठा परतावा देणारे फ्लॅट्स, एनए-४४ लेआऊट असलेले प्लॉट्स अशी खूप मोठी रेंज गुंतवणूकदारांसाठी उपलब्ध आहे.

तर मग फारसा उशीर करू नका...! आजच भेट द्या आर्च ग्रुपच्या आर्च कंचन, आर्च कुंदन, आर्च गुलमोहर, आर्च क्रिस्टल, आर्च कुसुम, आर्च शक्तीनगर या प्रकल्पांना... आणि साकार करा तुमच्या स्वप्नातील घर....!

याशिवाय आणखी मनमोहक गृहप्रकल्पांच्या महितीसाठी कॉल करा!